निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी लोकसहभागातून सातारा जिल्ह्यातील आपल्या निढळ या गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची उलगड करणारे सुनील चव्हाण यांनी लिहिलेले पुस्तक निढळ – ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न नुकतेच प्रकाशित झाले. प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात नानांचे भाषण अत्यंत भावस्पर्शी, मनस्वी, दिशादर्शक होते आणि म्हणूनच ते संस्मरणीय देखील होते. कलाकार असलो तरी आपण समाजाकडे कसे पाहतो, लोकसहभागातून कार्य उभारले गेले तर त्याचे परिणाम काय होतात, अशा कामांमधून मिळणारे समाधान काय देऊन जाते यावर नाना पाटेकर दिलखुलास बोलले आहेत. म्हणूनच, प्रत्येकाने जरुर ऐकावे आणि मनात साठवावे असे हे नानाचे शब्द...श्रोतेहो खास तुमच्यासाठी.
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة