इंद्रद्युम्नाची ब्रह्मलोक यात्रा आणि मंदिर प्रतिष्ठापना - Part 4श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तींची निर्मिती आणि मंदिराचंबांधकाम पूर्ण झालं. आता फक्त त्यांची प्रतिष्ठापना करायची राहिली होती. पणयातही अडथळा निर्माण झाला, ज्या भगवान जगन्नाथांची मूर्ती जी कोणत्याहीमनुष्याला निर्माण करणं अशक्य होतं, तिची प्रतिष्ठापना सामान्य ब्राह्मण कसाकरू शकेल? यासाठी कदाचित देवर्षी नारद किंवा देवगुरू बृहस्पती यांच्यासारख्यादैवी ऋषींची आवश्यकता होती.राजा इंद्रद्युम्न तपश्चर्येला बसला. थोड्या वेळाने, जेव्हा कोणीतरी हाकमारली तेव्हा राजाने ध्यान सोडलं. त्याच्यासमोर साक्षात देवर्षी नारद उभेहोते. त्याने देवर्षी नारदांना वंदन केलं. राजाने त्यांच्याकडे मंदिर आणि मूर्तींच्यास्थापनेविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती केली.देवर्षी नारद राजाला म्हणाले, "नारायण, नारायण! राजन, तू म्हणतोस तेबरोबर आहे. जे रूप मूर्तींमध्ये साकारण्यासाठी देवशिल्पी विश्वकर्माला यावंलागलं, त्या मूर्तींची प्रतिष्ठापना केवळ तोच करू शकतो जो त्रैलोक्यातीलसर्वश्रेष्ठ वेदज्ञ आहे.राजाने पुन्हा विचारलं, "क्षमा करा देवर्षी, पण तुम्ही आणि देवगुरु बृहस्पतीव्यतिरिक्त असा कोण पारंगत विद्वान आणि उत्कृष्ट ब्राह्मण आहे जो हेकार्य तडीस नेईल?”"हे राजन, मी त्यांच्या विषयी बोलतो आहे, ज्यांच्या मुखातून समस्तवेदांची उत्पत्ती झाली आहे ते माझे पिता ब्रह्मदेवांच्याच हस्ते भगवान श्रीहरींचं हेकार्य संपन्न होईल."
इंद्रद्युम्न आनंदाने म्हणाला, “ हे तर माझं भाग्यच!देवर्षी तुमची आज्ञाअसेल तर मी लगेच आपल्याबरोबर ब्रह्मलोकात येऊन प्रजापिता ब्रह्मदेवांनाआमंत्रण देऊ इच्छितो.""अवश्य राजन, तू जरूर ये." देवर्षी त्याला आपल्यासह सदेह ब्रह्मलोकात घेऊनजाण्यास तयार झाले.”इंद्रद्युम्नाने विद्यापति, विश्वावसू आणि राणी गुंडीचा यांना निरोप दिलाआणि लवकरच परत येण्याचं वचन देऊन देवर्षी नारादांसह ब्रह्मलोकाकडे प्रयाणकेलं. जेव्हा ते ब्रह्मलोकात पोहोचले, तेव्हा ब्रह्मदेव ध्यानमग्न होते. राजाइंद्रद्युम्न त्यांचे ध्यान संपेपर्यंत वाट पाहत तिथेच थांबला.काही काळानंतर, जेव्हा ब्रह्मदेवांचे ध्यान पूर्ण झाले. राजा इंद्रद्युम्नानेत्यांना वंदन केलं आणि मंदिराच्या प्रतिष्ठापना करण्यासाठी आमंत्रित केलं.ब्रह्मदेवांनी ते आनंदाने मान्य केलं. त्यांचा होकार मिळताच राजा खूप आनंदीझाला. ब्रह्मदेवांच्या आगमनाची वार्ता राणी गुंडिचाला सांगण्यासाठी तो आतुरझाला होता. आता तो ब्रह्मलोकाहून पृथ्वीलोकाकडे परत आला.निलांचलमध्ये परत गेल्यावर राजाचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसलानाही. कारण आता समुद्र किनाऱ्यावर ‘शंखक्षेत्र’ अशा नावाचं कोणतं ठिकाणचअस्तीत्वात नव्हतं. राजाचा राजवाडा, ते भव्य मंदिर आणि राजाने नव्यानेवसवलेली नगरी याचा कोणताही मागमूस दिसत नव्हता. जशी कोणत्याहीसमुद्रकिनार्यावर दिसते तशी, चारही बाजूला मैलोनमैल वाळूच वाळू पसरलीहोती. राजाला वाटलं की जणू आपण स्वप्नच बघतो आहोत, कारण काहीतासांपूर्वीच तर तो राणी गुंडीचाशी बोलला होता आणि आता तिथं कोणीचनव्हतं. असं कसं होईल ? राणी, विद्यापती, विश्वावसू, त्याचं मंत्रीमंडळ, प्रजा,कारागीर आणि हत्ती घोडेसुद्धा तिथून अदृश्य झाले होते.
राजा बराच काळ राणी गुंडीचा आणि विद्यापती यांना हाका मारतराहिला. पण काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी सर्वांच्या विरहाने व्याकूळझालेला राजा तिथेच समुद्रकिनाऱ्याजवळ वाळूत बसला."हे परमेश्वरा, आता पुन्हा कोणती परिक्षा घेतो आहेस? आता...पुन्हा.. कोणतीपरीक्षा ..." तो पुन्हा पुन्हा हेच विचारत राहिला.संध्याकाळ झाली तेव्हा त्याने काही लोकांना तिथे पाहिलं. इंद्रद्युम्नत्यांच्याकडे गेला आणि त्या जागेबद्दल विचारू लागला. समोरच्या माणसाने जेसांगितलं, ते ऐकून राजाच्या पायाखालची जमीन सरकली. तो माणूस म्हणाला,"तुम्ही बहुदा परदेशी आहात असं वाटतं महाशय, . हा उत्कल देश आहे आणियेथे गेल्या चौदा पिढ्यांपासून महापराक्रमी राजा गाल माधव आणि त्यांचापरिवार इथे राज्य करीत आहे."राजाने म्हणाला, "चौदा पिढ्या? हे अशक्य आहे. मी तर ऐकलं आहे की राजाइंद्रद्युम्नाचं इथे शासन आहे.""मी कधीही इंद्रद्युम्नाचं नावसुद्धा ऐकलं नाही. क्षमा करा, लोक चुकीच्यापत्त्यावर येतात, तुम्ही कदाचित चुकीच्या ठिकाणी आला आहात महाशय."राजाचं दु:ख आता संशयात रूपांतरित झालं . पण त्या माणसाला मूर्ख मानूनराजा पुढे चालू लागला. काही काळ चालल्यानंतर त्याला एका मंदिराचा ध्वजदिसला."नक्कीच नक्कीच हे माझं मंदिर आहे. विद्यापति आणि इतर लोकनिश्चितच इथे माझी वाट पाहत असतील!" असं म्हणत धावत इंद्रद्युम्नमंदिराच्या समोरच्या भागात पोहोचला.. जरी हे त्यानेच भगवान जगन्नाथांसाठीबांधलेलं मंदिर असलं, तरी त्या व्यतिरिक्त आसपास तो ओळखू शकेल असंदुसरं काहीच नव्हतं. सत्य जाणून घेण्यासाठी कासावीस झालेला राजा मंदिराच्याबाहेर बसलेल्या एका ब्राह्मणाजवळ गेला. आता पुन्हा एकदा इंद्रद्युम्नाचीचकित होण्याची पाळी होती.
ब्राह्मण म्हणाला, "राजा गाल माधव यांचं कुलदैवत भगवान विष्णूचं हेमंदिर आहे. बर्याच वर्षांपूर्वी, राजाच्या पूर्वजांना हे भव्य मंदिर पूर्णपणे मातीआणि वाळूच्या खाली लुप्त झालेलं सापडलं.”राजाला आश्चर्यचकित झालेलं पाहून ब्राह्मण पुढे म्हणाला,"अहो महाशय, मला तुमचं कुतूहल समजू शकतं. इतकं मोठं मंदिर जमिनीतकसं काय लुप्त झालं? तुला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे ना?"राजा आपली शुद्ध हरपून बसला होता त्याने कशीबशी मान हलवून ब्राम्हणाला‘होय’ असे उत्तर दिले.ब्राह्मण राजाला म्हणाला, "ऐक तर मग. या मंदिराविषयी एक लोककथासांगितली जाते. ही कथा मी माझ्या आजोबांकडून, माझ्या आजोबांनी त्यांच्याआजोबांकडून ऐकली आहे. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी इथे इंद्रद्युम्न नावाचा एकराजा राज्य करत होता. आमच्या महाराजांप्रमाणे तोसुद्धा निस्सीम विष्णूभक्तहोता. "हे मंदिर त्यानेच बांधले होते. परंतु प्रतिष्ठापना करण्यापूर्वी, एके दिवशीतो कदाचित ब्रह्मदेवाला आमंत्रित करण्यासाठी ब्रह्मलोकी गेला होता. त्यादिवसापासून आजपर्यंत कोणीही त्याला पाहिलं नाही."हे ऐकून इंद्रद्युम्नाला त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता."इंद्रद्युम्न राजाची प्रजा, त्याची राणी, मंत्रीमंडळ सर्वजण त्याची प्रतीक्षाकरताकरता मरण पावले, पण तो आला नाही. अशाप्रकारे, अनेक पिढ्यांनंतरत्याचं राज्य हळूहळू काळाच्या उदरात लोप पावलं. त्याने बांधलेलं हे मंदिरहीपूर्णपणे वाळूखाली गाडलं गेलं होतं. एके दिवशी आमच्या राजाच्या घोड्याचीनाल रस्त्यात एका वस्तूवर आदळली आणि राजा जमिनीवर पडला. तिथे खणूनपाहिल्यावर असं दिसून आलं की ते एका मंदिराचं शिखर आहे. बरेच दिवसखोदकाम केल्या नंतर या ठिकाणी भव्य मंदिराची रचना समोर आली. मंदिररिकामं असल्याने राजानं त्याचं कुलदैवत, भगवान विष्णुंच्या मूर्तीची स्थापना
केली. तेव्हापासून येथे वैष्णवपूजेची परंपरा सुरू झाली." ब्राम्हणाने इंद्रद्युम्नालाही कथा सांगितली. तो लहान बालकासारखा रडू लागला.ब्राह्मणानं रडणाऱ्या राजाला विचारलं. "महाशय काय झालं? तुम्ही त्याचइंद्रद्युम्न राजांचे वंशज आहात का?""हे ब्राह्मणश्रेष्ठा, नाही, मी काही वंशज नाही तर मीच तो दुर्दैवी इंद्रद्युम्नआहे."हे उत्तर ऐकून, ब्राह्मणाने काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी, राजा रडतमंदिराकडे धावू लागला. त्यांच्या मनात आता यात काही शंका नव्हती. ज्याब्रह्मलोकामध्ये एक दिवस पूर्ण झाल्यावर मृत्युलोकात संपूर्ण एक मन्वंतर पूर्णहोतं, तिथे त्याने घालवलेल्या काही काळाची भरपाई म्हणजेच ही एक हजार वर्ष!राजाला समजलं की तो त्यांना इथे सोडून गेला होता त्या सर्वांचा मृत्यू होऊनशेकडो वर्षे लोटली होती."भगवंता, तू माझ्यावर एवढा मोठा अन्याय का केलास? कालचक्राच्या याचाकाखाली माझं सारंकाही चिरडलं गेलं आहे. हे निलमाधवा, तुझी ही कोणतीलीला आहे? तुला त्याचं उत्तर द्यावंच लागेल..." राजा आता क्रोधाने आक्रोशकरत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जात होता. हे दृश्य पाहून तिथे उपस्थितसैनिक राजाला वेडा समजून गाल माधवच्या दरबारात घेऊन गेले.दरबारात त्याची चौकशी केली असता राजा इंद्रद्युम्नाने गाल माधव राजालासंपूर्ण कहाणी सांगितली. पण खचितच कोणी त्याच्या म्हणण्यावर विश्वासठेवला असेल. उलट राजसभेत उपस्थित सर्वच मंत्रीजनांनी त्याची थट्टा केली.काहींनी तर इंद्राद्युम्न शत्रू देशाचा हेर असल्याचाही आरोप केला."वृद्धापकाळामुळे तुम्ही मातिभ्रष्ट झाला आहात, जा जा.. तुमच्या याअवस्थेची मला दया येत आहे म्हणून, मी तुम्हाला शिक्षा करत नाही. मात्र जरतुम्ही पुन्हा असा अपराध करताना दिसलात तर तुम्हाला कठोर शिक्षा मिळेल."
असं सांगून गाल माधवानी इंद्रद्युम्नाचा अपमान केला आणि इंद्रद्युम्नालाराजदरबारामधून बाहेर काढलं.दिवसभराचं काम पूर्ण केल्यानंतर गाल माधव झोपी गेला तेव्हा रात्री उशिराभगवान विष्णू त्यांच्या स्वप्नात आले, ते म्हणाले,"अरे मुर्खा, तू तुझ्या अहंकाराने आंधळा झाला आहेस. आज ज्याचा अपमान तूकेलास तो माझा सर्वश्रेष्ठ भक्त इंद्रद्युम्न आहे. त्यानेच माझ्या आदेशानुसार हेमंदिर उभारले. हे मंदिर माझ्या पुरुषोत्तम जगन्नाथ स्वरूपाला समर्पित आहे, जेआजही त्याच्या सर्वश्रेष्ठ भक्ताच्या हस्ते स्थापित होण्याच्या प्रतीक्षेत वाळूतपडून आहे. जा, इंद्रद्युम्नाला सन्मानाने घेऊन ये आणि माझी आणि यामंदिराची विधीपूर्वक प्रतिष्ठापना कर."श्री हरी विष्णूची ही आज्ञा ऐकून, गाल माधव लगेच मध्यरात्री इंद्रद्युम्न राजालाशोधण्यासाठी निघाले. बराच शोध घेतल्यानंतर राजा इंद्रद्युम्न दु:खी होऊन मानखाली घालून समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेला त्यांना दिसला. इंद्रद्युम्नालापाहिल्यावर गाल माधव त्याच्या पाया पडला आणि आपल्या मूर्खपणाबद्दलक्षमा मागितली. त्यानंतर सन्मानपूर्वक राजा इंद्रद्युम्नाला त्यानं आपल्यामहालात आणलं.दुसर्या दिवशी सकाळी राजा इंद्रद्युम्न आणि गाल माधव मंदिरात गेले आणिवर्षानुवर्षे लुप्त झालेल्या त्रिमूर्तींचं निश्चित स्थान दाखवण्यासाठी भगवानविष्णूची प्रार्थना करू लागले. ते मंदिरातून बाहेर येताच एक जोरदार वादळ वाहूलागलं. वादळाच्या प्रभाव क्षेत्रापासून थोड्या अंतरावर, वाळूचा मोठा ढीग बाजूलाहोऊ लागला. वाळू दूर झाल्यानंतर प्राचीन मुर्तीशाळा दिसू लागली.हे दृश्य पाहून राजा इंद्रद्युम्नाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सर्व वाळू बाजूलाझाल्यानंतर मूर्तीशाळेची दारं आपोआप उघडली आणि आतून आलेला दिव्यप्रकाश पाहून सर्वच जण चकित झाले. इतके वर्ष लुप्त झाल्यानंतरही त्रिमूर्तींचं
तेज जराही कमी झालं नव्हतं. आयुष्यात प्रथमच विष्णूचं हे अनोखं रूपपाहणार्या गाल माधवच्या डोळ्यांतूनही अश्रूधारा वाहू लागल्या.योग्य वेळी देवराज इंद्र आणि देवर्षी नारद यांच्यासमवेत प्रजापिता ब्रह्मदेवतिथे आले.. ब्रह्मदेवाच्या निगराणीखाली वेदांच्या मंत्रोच्चारासह त्रिमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. द्वापारयुगात जारा आणि अर्जुन यांनी समुद्रातविसर्जित केलेला श्रीकृष्णाच्या अवशेषाने आता एका शक्तीपुंजाच्या रूपातभगवान श्री जगन्नाथांच्या मूर्तीमध्ये प्रवेश केला. हे अलौकिक दृश्य पाहून सर्वदेवदेवता स्वर्गातून फुलांचा वर्षाव करु लागले. राजा इंद्रद्युम्नांनी भगवानजगन्नाथाची प्रतिष्ठापना करण्याचं आपलं शेवटचं कर्तव्य पार पाडून आपल्यानश्वर देहाचा त्याग केला आणि वैकुंठ लोकात विश्वावसूजवळ आपलं स्थानग्रहण केलं.आजही, भगवान जगन्नाथ हे संपूर्ण जगातील एकमेव देवता आहेत ज्यांची मूर्तीचैतन्यमय आहे. श्रीकृष्णाच्या देहाचा तोच अवशेष ज्याला ‘ब्रह्म पदार्थ’म्हणतात तो आजही भगवान जगन्नाथाच्या मूर्तीत आहे, दर बारा वर्षानंतरएखाद्या मनुष्याप्रमाणेच त्रिमूर्तीचे अंत्यसंस्कार केले जातात आणि त्यावेळी श्रीकृष्णाचे अवशेष नव्याने तयार केलेल्या मूर्तीमध्ये स्थापन केले जातात. याप्रक्रियेला नवकलेवर म्हणतात. भगवान नीलमाधवांच्या देववाणी नुसार आजहीविश्वावसूचे वंशजच भगवान जगन्नाथांचे आद्य सेवक आहेत, ज्यांना दैतापतीम्हणतात.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices