"माझा प्रवास - १८५७ च्या बंडाची हकीकत" हा विष्णूभट गोडसे यांनी लिहिलेला मराठी प्रवास आहे. जो पेणच्या जवळच्या वारसाई मधून गेला. त्याच्या प्रवासादरम्यान, त्याने मोहो येथे कार्यक्रम पाहिले, झांसीच्या रानीसाठी काही महिने काम केले आणि झांसीची हार पाहिली, अयोध्याला भेट दिली आणि अखेरीस त्याच्या गावी परतफेड केली. विद्रोहांच्या त्याच्या मुठभेड़ांव्यतिरिक्त, त्यांनी हिंदू पवित्र स्थाने देखील भेट दिली.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789353372439
Release date
Audiobook: 11 October 2018
"माझा प्रवास - १८५७ च्या बंडाची हकीकत" हा विष्णूभट गोडसे यांनी लिहिलेला मराठी प्रवास आहे. जो पेणच्या जवळच्या वारसाई मधून गेला. त्याच्या प्रवासादरम्यान, त्याने मोहो येथे कार्यक्रम पाहिले, झांसीच्या रानीसाठी काही महिने काम केले आणि झांसीची हार पाहिली, अयोध्याला भेट दिली आणि अखेरीस त्याच्या गावी परतफेड केली. विद्रोहांच्या त्याच्या मुठभेड़ांव्यतिरिक्त, त्यांनी हिंदू पवित्र स्थाने देखील भेट दिली.
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789353372439
Release date
Audiobook: 11 October 2018
Step into an infinite world of stories
Overall rating based on 206 ratings
Informative
Mind-blowing
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 206
Satyajit
6 Apr 2020
कादंबरी फारच छान आहे. १८५७ चा काळ एका सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून एकायला फार छान वाटले. परंतु संदीप खरेच्या वाचन पध्दतीमुळे पुस्तकाच्या रसास्वादत सतत बाधा येते असं मला जाणवलं. ह्याचे वाचन करताना त्याच्या डोळ्यासमोर बाळ किंवा कुमार श्रोते असल्यासारखे वाचन केले आहे. किंवा नेहमीच वेगळे काहीतरी करायच्या उर्मीने कथेची लय हरपली आहे. त्यांनी स्वतः ला काय वाटते हे सांगण्यापेक्षा सलग वाचन करायला हवे होते आणि काही वाटण्याचा अधिकार श्रोत्यांना द्यायला हवा होता असं मला वाटते. एकूण चांगल्या कादंबरीचा वाचकामुळे रसभंग झाला आहे.
ANUPAMA
6 Apr 2020
मराठी साहित्यातील पहिले प्रवास वर्णन ऐकले प्रवास माणसाला कुठून कुठे घेऊन जाऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण. खूप रंजक, भीतीदायक, त्यावेळेच्या समाजाच्या राहणीमानाविषयी, विचारसरणी विषयी कल्पना येतेसुरवातीला वाचताना अर्थ स्पष्ट करून सांगितला ते योग्य केले त्यामुळे त्यावेळची मराठी भाषा समजून घेण्यास मदत झाली संदीप खरे यांनी रोचक पद्धतीने वाचन केले आहे ..याचा २ रा भाग आहे का?कारण संपले तेव्हा अर्धवट वाटले
शुभम
20 Dec 2020
खूप धन्यवाद यासाठी . १८५७ च्या काळाचे दर्शन एका मराठी माणसाच्या नजरेतून घडविण्यासाठी. तुमचा आवाज आणि वाचन खूप छान आहे.
सुदिन
18 Jul 2020
संकलन चांगले झाले आहे. वाचन / कथन श्रवणीय आहे.
Jaising
28 Mar 2023
अप्रतिम पुस्तक. 1857 च्या बंडाच्या काळातील उत्तर भारताची समाज व्यवस्था जी इतरत्र पाहायला मिळत नाही तिथे समजली. त्या काळातील आपापसातील दुही, वैयक्तिक स्वार्थ,गद्दार आणि देशद्रोही यांच्यामुळे आपण विजयापासून कसे दूर गेलो होतो हे वाचून मन विषण्ण झाले.. एक उत्तम साहित्यकृती वाचल्याचा आनंद मिळाला. संदीप खरे यांचे अभिवाचन अप्रतिम आहे. त्यांची ही बाजू माहीत नव्हती. या निमित्ताने कळली. ही हकीकत ऐकता ऐकता अचानक अभिवाचन संपले आणि रसभंग झाला.हे पुस्तक शेवटपर्यंत नाही असे जाणवले. पुस्तकाचा या पुढील भाग आहे का? न पेक्षा अभिवाचकाने शेवटी तसा उल्लेख करायला हरकत नव्हती..
Bharati
28 Aug 2021
खूप उत्सुकतेने, काहीतरी वेगळं वाचायला मिळेल म्हणून हे पुस्तक ऐकायला घेतले होते परंतु ऐकत असतांना आपण एखाद्या प्राचीन मराठी भाषेच्या वर्गात बसून ऐकत आहोत आणि गुरुजी आपल्याला प्रत्येक शब्दाचा/ वाक्याचा अर्थ समजावून देत आहेत असं वाटत होतं. तसंही हे पुस्तक साधारण 45 ते 50 वयाच्या पुढचेच वचक वाचतील असं गृहीत धरायला हवं. आजच्या तरुण पिढीला तर मराठी बोलायची मारामार तिथे हे मराठी पुस्तक, तेही एवढ्या जुन्या काळातलं,ते का वाचणार? त्यामुळे पुस्तकातल्या वाक्यांच्या जवळपास सगळ्याचा अर्थ वाचकांना श्रोत्यांना माहीत होत असावा. पहिल्या पंधरा मिनिटातच पुस्तक वाचण्यातला रस नाहीसा झाला. हे पुस्तक ऐकण्यापेक्षा ते वाचायला जास्त आनंद होईल असं वाटतं न समजणाऱ्या गोष्टींचा अर्थ पाठीमागे लिहून ठेवला तर वाचक तो पाहून समजू शकतील. त्यामुळे पुस्तक इथेच बंद करावं लागलं असं खेदाने नमूद करावंसं वाटतं.
Suresh
15 Jun 2020
खूप सुंदर...अगदी वेगळ्या प्रकारचे साहित्य.. वास्तव वर्णन... अभिवाचन सुंदर
vedashree
4 Mar 2020
Mast?.....
R
6 Jun 2022
गोष्ट अर्धवट वाटते आहे? नेहमीच Storytel च ending वाक्य पण नाहिये "आत्ताच आपण ऐकल..."
Pooja
1 Mar 2022
Explore unknown history of lakshmibai
English
India