१९वे शतक संपताना; २०वे शतक सुरु होत असतानाचा 'संधीकाल' - वैचारिक नवजागरणाची जी पहाट या भारतवर्षात झाली त्याची बरीचशी सुरुवात बंगालमध्ये होती असे म्हणता येईल. म्हणूनच -'बंगाल आज जो विचार करतो तो उद्या भारत करेल' असे त्यावेळच्या विचारवंतांना वाटत होते. विवेकानंद, योगी अरविंद, केशवचंद्र सेन, राजाराममोहन राय आणि रवींद्रनाथ ठाकूर यांच्यापर्यंत सर्व विचारवंत भारताचे उज्ज्वल भवितव्य पाहू शकत होते. गोरा किंवा गौरमोहन हा तर रवींद्रनाथांचा मानसपुत्र. उंच, धिप्पाड आणि शुभ्रधवल गौरवरणाचा गोरा, जो प्रथमतः ब्राह्मो समाजाच्या विचारसरणीने भारलेला होता, तो नंतर कट्टर धर्माभिमानी हिंदू होतो तो केवळ त्याच्या लक्षासाठी - भारतीय समाजाच्या उद्धारासाठी. स्वदेशाशिवाय कसलाच विचार न करणारा गौरमोहन अंतर्यामीचा मातृभक्त व दयाळू आहे तसाच अन्यायाविरुद्ध लढा देण्याला सदैव सज्ज असणारा आहे. त्याचे अंतरंग जाणणारा मित्र विनयभूषण हा जणू त्याची सावली. सुचरिता, परेशचंद्र व इतर यांचं एक छोटंसं पण व्यापक विचार करणारं जग ह्या कथेत आहे.
रवींद्रनाथांची अतिशय गाजलेली, हि गोराच्या स्व-च्या शोधाची व अंतर्गत मानसिक संघर्षाची कथा. आजच्या काळातही 'गोरा' आपल्याला भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक जीवनाचा आरसा बनून वाचकांच्या मनाची पकड घेतो
© 2023 Zankar (Ebook): 9789389514933
Translators: Sunila Buddhisagar, M.G.Buddhisagar
Release date
Ebook: 15 October 2023